रविवार, १८ एप्रिल, २०२१

माँसाहेब जिजाऊ



जय जिजाऊ जय शिवराय


आज जो हा महाराष्ट्र आहे तो फक्त आणि फक्त माँसाहेब जिजाऊ मुळेच आहे. याच करण तुम्हा सर्वांना माहीत असेलच शहाजी राजांनी जे स्वप्न बघितले आणि ते त्यांना प्रत्येक्षात उतरवायचे होते. पण काही कारणांमुळे ते त्यांना नाही करता आहे पण त्यांच्या पत्नी माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्याच्या मातोश्री जिजाऊ यांनी ते निर्माण केले. फक्त  निर्माण केले नाही तर ते अस केले की आजही ३५० वर्ष ओलांडून गेली तरी हा महाराष्ट्र विसरणार नाही. अस मोठं झाड त्यांनी उभारलं ते म्हणजे स्वराज्य. 

माँसाहेब जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहान पणा पासून शूर पराक्रमी योधांच्या गोष्टी सांगण्यात सुरुवात केल्या होत्या. त्यांचे शिक्षक, कला, तलवार चालवणे भाले चालवणे अश्या बऱ्याच कला त्यांना लहान पणा पासूनच शिकवण्यात सुरू केलं होत्या. लढाया, डावपेच, राजनीती जमेल ते शिक्षण त्यांनी शिकवले काही वेळा तर त्या स्वतः हातात तलवार घेऊन महाराजांना शिकवत होत्या. त्यामुळेच पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी एका छोट्याशा रोपाच रूपांतर मोठ्या झाडात केलं ते म्हणजे स्वराज्य. पण स्वराज्य असच उभं नाही झालं तर जिजाऊ स्वतः सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज नसताना त्या लढाईत शामिल होत कारण त्यांना ठाऊक होतं स्वराज्य असाच नाही उभ राहणार कारण राजाने सिहासणवार बसून मावळे लढायला जाणे हे पटतच नव्हते त्यांना चांगलेच माहीत होते आणि ती शिकवण त्यांनी छत्रपतींना पण दिली होती. तेच शहाजी राजांचे आणि माँसाहेब जिजाऊंचे स्वप्न काही जिवलग सवंगडी सरदार आणि मावळे  साथीने आणि त्यांच्या रक्ताने ते प्रत्येक्षात सतत्यात उतरवले. 

आजही महाराष्ट्र आणि हिंदुस्तान या राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना विसरू शकणार नाही आणि   हे अफाट सह्याद्री आणि हे गगनाला भिडणारे गड किल्ले अजूनही ३५० वर्ष ओलांडून गेली तरी या गड किल्याचे बुरुज अस्तित्वात असल्याचे साक्षी आहेत.

५ टिप्पण्या:

मुंबईच्या पाऊलखुणा

  मुंबईच्या पाऊलखुणा       दादर मधील पुस्तकांच्या स्टोर मध्ये नजरेस पडलेलं एक पुस्तक मुंबईच्या पाऊलखुणा .        आज आपण मुंबईत राहतो पण त्या...