रविवार, २३ मे, २०२१

मीडिया

 

          पूर्वी काळी न्युज कशी असायची तर दूरदर्शन वरील संध्याकाळी ७.०० च्या बातम्या आजोबांन पासुन ते आपल्या आई वडिलांना पर्यंत सुरू असलेल्या. मला अजून आठवत आहे लहान पणी रोज त्या ७.०० च्या बातम्या आम्हाला बाकी सर्व प्रोग्राम बंद करायला लागत होते कारण संध्याकाळी ७.०० वाजले की दिवस भरतील सर्वच घडामोडी समजत होत्या म्हणून आवर्जून सर्वच जण त्या बातम्या बघत होते कारण त्या बातम्यांची पध्दत अजून पण मला आठवते एकदम शांत आणि सविस्तर होती एकदम पद्धतशीर कुठेच कधीच तो आरडाओरडा या धांगडधिंगा ते ब्रेकिंग न्युज आणि टीरपी साठी वरचढ करून अस काही नसायचं खर सांगू अजून पण ते दिवस चांगलेच आठवतात. करण आज त्याच रूपांतर मीडिया मध्ये झालं आहे.

          आज तो काळ आणि आताचा काळ त्या बद्धल बोलायचं तर खर तर शीव्या घालूशी वाटत आहे. हे आज कालचे न्युज वाले एकाच दोन कधी आणि काय करतील कारण एडिटिंगचा जमाना आहे. हे टीरपी मिळवण्यासाठी काय नाही ते करतील आणि उगाच त्या सध्या न्युजची ब्रेकींग न्यूज कशी करतील कोणाला माहीत पण खर तर त्या न्युज लवकर कळतात पण त्या न्यूजचा अर्थचा अनर्थ करून टाकतात. 

         आताच बघा ना कोरोना किती घातक झाला आहे आपल्या सर्वांच माहीत आहे. कोरोनामुळे सर्वच जण घाबरले आहेत. काय करणार घाबराव तर लागणारच आणि सर्वच तसे घाबरले आहे पण हे मीडियावाले टी आर पी साठी न्युज वर अश्या काही व्हिडिया दाखवत आहेत की पब्लिक अजून घाबरून जात जात आहेत. खर तर ब्रेकिंग न्युज ब्रेकिंग न्युज करून लोकांच्या मनाशी खेळत आहे. कोण गेलं कसा मेला अक्षरशः मशानातील जागा पण त्यांनी सोडल्या नाहीत.  अरे काय चालवलं आहे हे अरे किती ते आणि कोणत्या पातळीवर जातंय रे. मला अक्षरशः किव आली आहे ह्या सर्वांची आता तर न्युज बघायचं सोडुनच दिल बस कंटाळून गेलो. 

मीडिया वाले अरे तुम्हाला टी आर पिच वाढवायची आहे ना तर काही अश्या न्युज दाखवा की लोकांना त्याचा फायदा होईल आणि रोज बघतील पण कुठे कोणते हॉस्पिटल आहे कुठे उपचार व्यवस्थित भेटतील कुठे औषध लवकर भेटील तो पेशंट कसा बरा झाला शक्य नसताना पण एखाद्या वृद्ध व्यक्तीने कोरोनावर  कसा मत केला  अश्या काही न्युज दाखवा. पण नाही तुम्हाला तुमच्या ब्रेकिंग न्युजची पडली आहे. अरे बस करा का लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. 

         आज ह्या सर्व लोकांना धैर्याची गरज आहे आणि ह्या संकटातून लबाहेर कस निघायचं आहे ह्याची गरज आहे. तर कृपा करून अश्या काही ब्रेकिंग न्युज दाखवा की ह्या सर्व लोकांना एनर्जी येईल. आणि कोरोना नावच राक्षसाला मारण्याची ताकद येईल. कारण आता हेच मोठं शस्त्र आहे.

शनिवार, ८ मे, २०२१

मराठा आरक्षण


        मराठा आरक्षण जास्त सविस्तर नाही बोलत कारण सर्वाना माहीतच आहे. आपण का हे आरक्षण मागत आहोत. हे आरक्षण मराठीच लोकांसाठी नाही तर त्या मागासवर्गीय लोकांसाठी कारण गरीब गरीब होत आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत आहेत. ज्यांना आरक्षण भेटत आहे तो त्याची ऐपत नसून पण वरचढ होत आहे आणि ज्यांना आरक्षण नाही तो कितीही त्या पदासाठी परफेक्ट असला तर तो मागेच राहत आहे. आम्ही बोलतो हा असा भेदभाव कडून टाका हे आरक्षण आम्हाला पण नको तर मग कोणालाच नका देऊ आरक्षण.


          ह्या आरक्षणामुळे अगदी लहानपणा पासुन ते मोठं होईपर्यंत सामोरे जावे लागते शाळा कॉलेजचे ऍडमिशन जॉब सरकारी नोकरी पासून पोलिस भरती अशा प्रत्येक ठिकाणी ह्या आरक्षणाला सामोरे जावे लागते. का अस हा तर अत्याचारच आहे ना. मग ह्या अत्याचाराला सामोरे जावेच लागणार होते म्हणून मराठी माणूस पुढे आला त्या आरक्षनासाठी आणि प्रत्येक राज्यात हे लाखोने मराठी मोर्चे काढण्यात आले कारण सर्वांना सारखाच न्याय मिळावा म्हणूनच आजवर हा मराठी माणूस झगडत आहे. तो स्वतः साठी नाही तर त्या गोरगरीब कुटुंबात त्याला हक्काचा न्याय मिळावा. 




        इतिहास साक्षी आहे आजवर असे   मोर्चे कधीच नाही झाले. जो पर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मराठी माणूस त्यांच्या हक्कासाठी झगडत होता झगडत आहे आणि झगडत राहणार...



एक मराठा लाख मराठा...

शनिवार, १ मे, २०२१

१ महाराष्ट्र दिन

१ मे महाराष्ट्र दिन

 

        १ मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यामूळे १ मे हा महाराष्ट्र दिन म्हूणन साजरा केला जातो. त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसांनी आंदोलने केली आणि ह्या आंदोलनात १०५ हुतात्मे शहिद झाले ह्या हुतात्म्यांच्या बलिदानमूळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमतं घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली आणि त्यामुळेच आज १ मे आपण महाराष्ट्र दिन म्हूणन साजरा करतो. मनाचा मुजरा ह्या शाहिद हुतात्म्यांना.

        आज महाराष्ट्र कोरोना रुपी संकटात सापडलेला आहे. सरकारने या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन केलेला आहे. सर्वजण घरात अडकून पडले आहेत. जो तो स्वतःची व स्वतःच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी स्वतःला घरात बंदीस्त करून घेत आहे. तरीही त्यात हजारो हात बाहेर राबत आहेत. आपण सुरक्षित राहावं म्हणून स्वतःच्या आणि परिवाराच्या जीवाची पर्वा न करता बाहेर काम करत आहे. जे घरात बंदीस्त सामान्य लोक आहेत त्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. खरच सलाम त्यांच्या शौर्याला. कोरोना काळात ज्या कोरोना योध्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या तमाम ज्ञात अज्ञात कोरोना योध्याना महाराष्ट्राच्या जनतेतर्फे मानाचा मुजरा. 



जय महाराष्ट्र...


मुंबईच्या पाऊलखुणा

  मुंबईच्या पाऊलखुणा       दादर मधील पुस्तकांच्या स्टोर मध्ये नजरेस पडलेलं एक पुस्तक मुंबईच्या पाऊलखुणा .        आज आपण मुंबईत राहतो पण त्या...