सोमवार, २६ एप्रिल, २०२१

राजकारण

 राजकारण


          माझे हे दुसरे आर्टिकल खर सांगू तर मी माझे दुसरे आर्टिकल छत्रपती शिवाजी महाराजांनी वरून लिहणार होतो. पण काय करू आता जी परिस्थिती आहे त्या वरून थोडं माझं मत मांडत आहे ह्या आर्टिकल मार्फत.

          तुम्हा सर्वांना माहीत असेल आता काय परिस्थिती चालू आहे. देशाची एवढी बेक्कार हालत चालू आहे तर ह्याला जबाबदार कोण आहे. तुम्हाला माहीत असेल सांगायची गरज नाही. पण का एवढी बेक्कार परिस्तिथी आहे. तर ह्याच कारण हे राजकारणी लोकच आहेत. मी कोणा एका पक्षाला दोष देत  कारण सर्व एकाच माळेचे मणी आहेत. एक सत्तेवर बसला की दुसऱ्याला बगवत नाही आणि तेच आता झालं आहे. पण आता ती वेळ आहे का हे असं एक मेकांची धून भांडी, एक मेकांना टोनगे मारण्याची आहे का ही वेळ सांगा. संपूर्ण देशात काय हालत चालू आहे माणसं हजारो ने मरत आहेत काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. पोटचा घास भेटत नाही. कोणाचे वडील, आई, भाऊ, बहीन, आजी आजोबा कोणाचा मुलगा जो त्या कुटुंबातील एकच आसरा होता गमावून बसलेले आहे. तरी पण ही प्रजा तुमच्या वर विश्वास ठेवत आहे. पुढे परिस्थिती सुधारेल पण नाही असच जर राजकारण चालत असेल तर हे राजकारणी लोक हा भारत देश विकून खातील. बाहेरील देशात कोरोना हळूहळू नाहीस होत चालू आहे परिस्थिती सुदारत चालू झाली आहे. आपल्या भारत देशात हे राजकारणी लोक काय कोरोना जाऊ देणार नाही असं वाटत आहे. कारण ह्यांना काहीही पडली नाही ह्या गरीब जनतेची काही पण हालत होऊद्या. ह्यांना फक्त सत्ता महत्वाची आहे. तिकडे जनता मरू देत तडफडू देत नाही तर काहीही होउदे. बस हे फक्त सत्तेचे भुकेले आहेत. जी परिस्तिथी ह्या सामान्य जणतेवर आली आहे ना ती तुमच्या सर्वांवर आली पाहिजे मग समजेल काय ते.

          अजून पण वेळ नाही गेली परिस्थिती सुधारू शकते. माहीत आहे असं नाही होणार पण एकदा ह्या मोठ्या कोरोना संकटाला मात करण्यासाठी या सर्व पक्षांनी एकत्र मिळून काम करा आणि वाचवा ह्या भारत देशातील जनतेला नाही तरी ही जणताच राहिली नाही तर पुढे काय होईल तुम्हाला हे राजकारण खेळण्यासाठी ही जाणताच उरणार नाही आणि जी आहे ती पण तुमच्या वर विश्वास ठेवणार नाही. कृपा करून ह्या सामान्य जनतेसाठी तरी एकत्र या ह्या सामान्य जनतेचे हाल बघून नंतर खुप वेळ आहे. मग बसा खेळत राजकारण नाही तुम्हांला कोण काही बोलणार पण आत्ता तुम्हीच हे संकटं घालवू शकता. जशी आपण बाहेरील देशांना मदत केली आहे तशी आपण सर्वांनी एकत्र या.

          अध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती तुम्हा सर्वाना कळकळून विनंति वाचवा ह्या भारत मातेला आणि ह्या गोरगरीब जनतेला तुमची गरज आहे. तुम्हीच वाचवू शकाल ह्या मोठ्या कोरोना नावाच्या भयानक संकटांतून आणि बनवा एक महासत्ता जगाला दाखवून द्या की भारताने बाकीच्या देशाला आधी संकटातून बाहेर काढलं आणि नंतर स्वता संकट मुक्त झाला. दाखवून द्या ह्या जगाला भारत काय चीज आहे ते एकत्र आला तर काय करू शकते. 

          भारतातील ह्या सामान्य जनतेचे शब्द आहेत. हे आर्टिकल आवडल्यास सर्वांपर्यंत पोहचेल अस शेअर करा आणि तुमचे मत जरून कळवा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मुंबईच्या पाऊलखुणा

  मुंबईच्या पाऊलखुणा       दादर मधील पुस्तकांच्या स्टोर मध्ये नजरेस पडलेलं एक पुस्तक मुंबईच्या पाऊलखुणा .        आज आपण मुंबईत राहतो पण त्या...